वीर विठ्ठलाचे गाढे । कळिकाळ पाया पडे ॥ करिती घोष जयजयकार । जळती दोषांचे डोंगर ॥ दया क्षमा शांति । बाण अभंग हे हाती ॥ तुका म्हणे बळी । तेचि एक भूमंडळी ॥