वीर विठ्ठलाचे गाढे । कळिकाळ पाया पडे ॥
करिती घोष जयजयकार । जळती दोषांचे डोंगर ॥
दया क्षमा शांति । बाण अभंग हे हाती ॥
तुका म्हणे बळी । तेचि एक भूमंडळी ॥